देव भावाचा भुकेला
निशब्द देव मराठी कवितेला पडलेले एक भाव गर्भ स्वप्न,मनात आलेल्या भावनांना शब्दांचे रंगरूप देऊन रसिकांच्या मनापर्यंत पोहचविण्याचे काम हे कवीचे काम ,आणि निशब्द हा शत प्रती शत कवी आहे. अतिशय थोडक्या शब्दात जास्तीत जास्त भाव व्यक्त करणे हे उत्तम कवितेचे आदिस्वरूप.निशब्द ह्या कलेत पारंगत आहे.
जीवन चढ उतारांच्या सापशिडी च्या पटावरमुद्रांकित केलेले असते.सुख दुक्ख ,आहेरे नाहीरे ,उन्हा पाउस,जन्म मृत्यू ,अश्या अनेक उलट अर्थी शब्दांची ओळख होताच जाते ,त्यातून पाझरणारे भाव शब्दांच्या जवळपास पोहचतात पण कधीकधी ह्या दोन टोकांच्या मध्ये होणारी घुसमट मात्र निशब्द असते ,आणि देव त्या घुसमटीला अचूक शब्दांच्या पकडीत पकडतात आणि वाचका पर्यंत पोहचवतात ,जळणाऱ्या ज्वालेला शब्दात रंगवता येते पण धुमसणाऱ्या घुसमटीला शब्दांचा टाहो फोडणे फार कठीण आणि देवाच्या कवितेत नेमके तेच सामर्थ्य आहे ,निश्श्ब्द असूनही अतिशय बोलकी अशी हि देवांची बोलकी कविता केशवसुतांच्या "झपूर्झा गडे झपूर्झा"ह्या कवितेशी जवळीक साधणारी वाटते.
आभाळा एवढे दुक्ख दोन ओळीच्या कवितेत मांडण्याचे आणि त्यायोगे अनुचित राजकारणावर दोनच ओळीचे काव्य आसुडा प्रमाणे ओढणारी
त्यांची कविता जेव्हा "चांगले गुण होते पण जातीने गोंधळ केला म्हणते "तेव्हा मंडलआयोग आणि त्यानंतरचे अजूनही धुमसणारे जळीत उभे राहते.
देवांची कविता हि सर्वगामी आहे ,व्यक्ती पासून समष्टी पर्यंत पोहचणारी ,दुक्खाचे पापुद्रेन पापुद्रे सैल करणारी आणि आणि सुखकर तुझा प्रवास विठ्ठला म्हणत आध्यात्य्म्याच्या अबोल मुक्तीला स्पर्श करणारी कविता.
देवांची कविता काम क्रोध मद मोह मत्सर ह्या सर्व मानवी गुण अवगुणाचे चित्रणही फार छान करते.कारण कल्पनेचे पंख लाऊन फिरणाऱ्या ह्या कवीचे पाय मात्र वास्तवाच्या मातीत घट्ट रोवलेले आहेत.
देवांची कविता आणि तिचा अर्थ म्हणजे सतत वाहत जाणाऱ्या आणि पात्र बदलणाऱ्या नदीचे चित्रण शब्दात न पकडता येण्या जोगे ,शब्दांच्या कवेत दुक्खला कवलानारी आणि अर्थाच्या रंगात सुखाला रंगवणारी.देवांची कविता ,निशब्द देवाची बोलाकेच नव्हे तर अबोल करणारी हि कविता एकून म्हणावसे वाटते "देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो."सूर्य किरणासारखी स्वच्छ आणि लखलखीत पसरणारी आणि आभाळ माये सारखी बरसणारी देवांची कविता आणि निशब्द देव ह्यांना मैत्रायानाचे सलाम .
शशांक रांगणेकर
मुंबई

No comments:
Post a Comment