Wednesday, March 18, 2015

Wednesday, February 11, 2015

Saleel

चिरंजीव सलील , रविवार दिनांक ८ रोजीलोकरंग ह्या पुरवणीतला तुझा कानगोष्टी हा लेख वाचला फार आवडला ,"आयुष्यावर बोलू कांही मधला आमचा लाडका सलील परत दिसला .तुझ्या ह्या कानगोष्टी तून तू काही रिकामटेकड्या आणि जगाच्या कल्याणाची आणि सार्वजनिक नितीमत्तेची काळजी जणू नियतीने आपल्याच शिरावर टाकली आहे असे समजून अक्षरशः "भाकणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांवर चपराक मारली आहेस ,काहीतरी अफवा पसरवणारी हि मुसोलिनीची अवलाद कित्येकांचे आयुष्य बरबाद करतात ,त्यांना सार्वजनिक नितीमत्तेची कसलीही चाड नसते ,जगात नर आणि मादी सोडून कुठलीही नाती ते मानत नाहीत ,असूया हा स्थायी भाव प्रगत करत हे वाचाळवीर अफवा पसरवण्याचे काम सातत्याने करत असतात .,समाजजीवन कलुषित करून आपली कंडू शमवणे हेच ह्या लोकांचे काम असते ,आणि आशय लोकांच्या माकड चाळ्यांकडे दुर्लक्ष करणे बरयाच वेळा परवडणारे नसते कारण "म्हातारी मेल्याचे दुक्ख्ख नाही पण काळ सोकावतो ,अश्या प्रवृत्तींवर सामाजिक बहिष्कार घालून सुसंस्कृत मराठी समाजानी एक नवीन दिशा दाखवावी .तुझ्या कानगोष्टी तून ह्याला तोंड फोडले आहेस ,ह्या अपप्रवृत्तींना अंशतः आळा घालण्याचे काम स्पृहणीय आहे ,असेच लिहत जा ,तुझ्या भावी लिखाणाला आणि तुला अनेक आशीर्वाद . तुझा काका शशांक रांगणेकर . ता. क. हे काका पुतण्याचे नाते आपल्या वयातला फरक आणि तुझ्या बद्दलची आपुलकी दर्शक आहे -- शशांक रांगणेकर ९८२१४५८६०२ -- From The Dessk of Shashank 207 B,Planet Industrial Premises Co-op Society Limited, Subhash Road, Vile Parle (East) , Mumbai - 400 057 India Tel :91-022- 26144220,91-022-26120460 Fax : 91-022-26135682

लोकसत्ता मुम्बइ. आदरणीय महोदय , आजच्या बातम्यात आपचा विजय आणि bjp च्या पराभवाच्या बातम्या ऐकल्या ,आणि भारतीय समाजाच्या आणि जनमानसाच्या सुज्ञ पणाची खात्री पटली ,अखेर मतदार राजा हाच सर्व निवडणुकांचा सर्वार्थाने नायक असतो ,कोणाचाही उद्दामपणा तो चालवून घेत नाही ह्याचे हे समर्पक उदाहरण .लोकसभा जिंकली म्हणजे सर्वच जिंकले अथवा जिंकूच अश्या तोर्यात जर कुणी चालत असेल तर मतदार राजा त्या तोर्याचे तीनतेरा करायला फारसा वेळ लावत नाही ।कधि कधी असे वाटते कि माननीय पंतप्रधानांवर "परमेश्वरा तू माझ्या मित्रांपासून मला वाचव ,शत्रूंकडे मी यशस्वीरीत्या लढेन "असे म्हणण्याची पाळी येऊ नये म्हणजे मिळवली . एक उमदे व्यक्तिमत्व bjp ला पंतप्रधानांच्या रूपाने नेतृत्व करण्यासाठी प्राप्त झाले आहे ,त्यांना सहयोग करून राज्यकारभार सुरळीत पणे चालावू द्यावा हे पाहणे सोडून काही वाचाळ नेते नको तितके, नको ते आणि नको तिथे बोलून अडचणीत आणण्याचे गोरख धंदे करत आहेत. हा तमाशा असाच चालला तर कंटाळून जनता "इंद्राय सह तक्षकाय स्वाहा "करायला वेळ लावणार नाही. नाटकाची पहिली घण्टा वाजली आहे . दुसरी आणि तिसरी वाजायच्या आगोदर भाजपियांनी ह्यावर विचार मंथन जरूर करावे ,भारतीय राजकारणात निर्नायकी अथवा पोकळी येऊ नये म्हणून जवब्दारीने वागावे आणि बोलावे ,हीच काळाची गरज आहे ,आणि एक मराठी म्हण लक्षात ठेवावी कि "तेह्तीशी (तेहत्तीस कोटी देव)काय करेल ते बत्तीशी (बत्तीस दात वाणी)करेल . थोडक्यात उतू नकोस मातु नकोस घेतला वसा टाकू नकोस हाच इशारा मतदार राजांनी केला आहे. आणि समझदार को इशाराही काफी रेहता है ,संत कबीराच्या दोन ओळी आठवतात "माती सांगे कुंभाराला पाई मज तुडविशी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी . शशांक रांगणेकर --

Saturday, October 11, 2014

जात आणि धर्मह्या सदराखाली "हिंदूब्राम्हण@ असे लिहिणेकिती स्फोटक आहेह्याची तुम्हाला कल्पनाआहेच .,पण सार्थअभिमानाने तसे लिहिणाराएक युवक आढळला,आपल्या जाती धर्माचासार्थ अभिमान हादुर्गुण नव्हे तर दुसऱ्याच्याजाती धर्माबद्दल हिनातेचीभावना हा दुर्गुण,
उपख्यांवरून ब्राम्हणत्व ठरते तेकेवळ सामाजिक अथवाराजकीय सोयींसाठी ,पण खरेब्राम्हणत्व ठरते तेमाणूस जेव्हा सतीअरुंधतीच्या ब्राम्हणाच्या व्याखेत बसतो तेव्हा,"याह ब्रम्ह जानाति सहाब्राह्मणः "हि अरुंधतीचीव्याख्या आणि केवळह्या व्याख्येत बसणाराविपिन खरा ब्राम्हणआहे आणि त्यामुळेचत्याचा अभिमानही सार्थ आहे.
"एकाच संधी असतेआयुष्य जगण्याची "हे ज्याला कळले त्यला ब्रम्हज्ञान प्राप्त झालेम्हणायला हरकत नाही,कारण आयुष्य एकाचमिळते अशी जाण असणारामाणूस भविष्यावर अवलंबूनन राहता वर्तमानाच्या सहाय्याने
आयुष्य खर्या अर्थाने संपन्नकरत असतो
सामाजिक घटना इतिहासह्याचे भान ठेवणेफार आवश्यक आहेज्या जगात आपणराहतो त्या जगाशीआपले देणे घेणेअसतेच ,जगात राहूनआपल्या घराची मनाची आणिबुद्धीची कवाडे झाकणे हि खरीतरकृताघानता ठरेल ,समाजात घडणाऱ्यासाधक बाधक घटनाक्रमांची नोंद घेऊनयोग्य वेळी त्यावरभाष्य करणे आणितीही सभ्य भाषेतकरणे हा समाजप्रबोधनाचा अविभाज्य भाग आहे,सामाजिक संकेत स्थळे हिउखाळ्या पाखाळ्या काढण्याची जागानाही असे ठणकावून सांगणाराविपिन मनापासून भावतो
संवेदना शीलता हे एकमराठी मनाचे आद्यस्वरूप
,मातृभाषेवर प्रेम हि त्याचीदुखती राग ,मुंबईतमराठीला आणि मराठीमाणसाला जागा नाहीअशी सल ठेऊनराहणारी माणसेच एक दिवससंयुक्त महाराष्ट्र घडवतात ,आपल्यामनातली हि सलविपिन सतत दर्शवितअसतो आणि तेहीअंग्लाभाशेवर प्रभुत्व नाही हिम्हणून नव्हे तर मातृभाषेवरमनापासून प्रेम आहे म्हणून.
तरुण वयातही सामाजिकजाणीवाचे भान ठेवणाराहा युवक खर्याअर्थाने "हिंदू ब्राम्हण"आहे
कारण जगातली सगळ्यातचांगली आणि वाईटगोष्ट एकाच आहेती म्हणजे माणसाचेमन , आणि ज्यालामनाचे हे ब्रम्हस्वरूप ज्ञान प्राप्त झालेआहे त्याहून मोठाब्राम्हण कोणता ,
विपिन च्या ह्याब्रम्ह स्वरूपाला मैत्रायाणाचे अभिवादन
आज आकाशात बरेचसे ढग दाटून आले आहेत ,तृषार्त चातका प्रमाणे सर्व जण पावसाची वाट पाहताहेत ,फेस बुक हि आमची खिडकी झाली आहे ,ह्या खिडकी तून बाहेरचे वारे येतात आणि जगात काय चालले आहे आहे ह्याची जाणीव करून देतात. म्हंटला बघूया फेस बुक वरचा पाऊस काय म्हणतोय .सर्फ करता करता एका कलाकाराचे प्रोफाईल नजरेत पडले ,शशांक केतकर ह्याचे आणि नावात साम्य असल्याने ते पूर्णपणे पाहण्याचा मोहही आवरला नाही.

एक अतिशय सुंदर आणि सोप्प्या शब्दात गुंफलेले चारच ओळींची कविता होती,"बोलले मेघ हे सारे अन बोलले थेंब रे ...........
अतिशय तरल शब्दात पावसाच्या चाहुलीची भावपूर्ण कुजबुज सांगणारी हि कविता मनापासून भावली.
प्रोफाईल ची सफर चालूच होती ,आणि तिळा उघड म्हणताच उघडणारी अलिबाबा ची गुहा उघडली.
केवळ चकचकीत चेहरा असलेला हा रंगकर्मी नाही तर सामाजिक संवेदानाचे भान ठेवणारा ,मनात कविता जपणारा आणि फुलवणारा एक संवादशील कलाकार आहे.
चेहऱ्यावर चमकणारे बुद्धिमत्तेचे तेज आणि डोळ्यात ओथंबणारे माणुसकीचे मेघ.आणि प्रसन्ना व्यक्तिमत्वाचे गुलाबी वलय. छोट्या पडद्यावरचे एक मोठे उदयोन्मुख आगमन.
मी सहसा मालिका बघत नाही कारण त्यात दिसणाऱ्या व्यक्ती मला अनोळखी वाटतात ,चांगुलपणा आणि दुष्टपणा ह्याची सीमा गाठणारी व्यक्तिमत्व अजूनतरी परमेश्वर कृपेने माझ्या भेटीला आलेली नाहीत. पण शशांक काम करत असेलेली सिरीयल थोडा वेळका होईना त्याच्या उपस्तिथी मुले सुसह्य वाटते. एक संयत अभिनयाचे दर्शन होते.

शशांक ने अभिमानाने आपण जोपासलेल्या झाडाच्या आंब्याचे फोटो भिंतीवर टाकले आहेत.मातीशी नाते सांगणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सिरीयल च्या कचकडी जगात राहूनही स्वतःच्या श्रमाने मोहरणारे अनोखे रूप.

ज्ञान कोशकार केतकर महाराष्ट्रातले एक धीमंत व्यक्तिमत्व ,शशांक हि त्या बुद्धीचा वारसा ठेऊनच आहे.सेलिब्रेटी आणि त्यांचे समाजकार्य ह्यावरचे त्याचे भाष्य त्याच्या निरक्षण क्षमता आणि अचूक भाष्य हे ह्याची ठळक ओळख देतात.
शशांक एक लोकप्रिय कलाकार आहे ,पण तरीही त्याच्या कला गुणांना पुरेसा वाव मिळत नाही आहे हि खंत मनात कुठेतरी सालात राहते ,कदाचित त्याचे व्यक्तिमत्व पेलवेल अश्या भूमिका सिरीयल निर्मात्यांकडे नसाव्यात का.अभिनय उच्चारण आणि प्रसन्ना व्यक्तिमत्व लाभलेल्या ह्या गुणी कलाकार ह्या छोट्या पडद्याला पेलवत नाही कि उमगत हेच नाही कळत .
नाही.
शशांकाचे पूर्ण प्रोफाईल मी पहिले आनंद वाटला मराठी कलाक्षेत्राला एक सुसंस्कृत बुद्धिमान लोभस आणि तेजस्वी वाक्तीमात्वा नियती भेट म्हणून देते आहे आणि छोट्या पडद्यावरच्या बड्या बुजुर्गांनी ह्या नावागाताच्या दैवी देणगीचा लाभ घेऊन त्याला आणि ह्या छोट्या पडद्यालाही मोठे बनवावे सर्वार्थाने.
मनात डोकावणारा एक अनाहूत विचार "मी ह्या व्यक्तीला ओळखतही नाही तरीही मला ह्याच्या बद्दल चार शब्द लिहावेसे का वाटले उत्तर आले ते दैवी गुण बुद्धीचे रूपाचे आणि माणुसकीचे त्यांना तू पूर्ण ओळखतोस ना ते ह्याचात दिसले आणि त्यंनी घातलेल्या सादेचा हा प्रतिसाद असावा आणि काय.
शशांक शिरीष केतकर ह्या व्यक्तीलाच नव्हे तर व्यक्तिमत्वाला मैत्रायाणाच्या हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२
चिरंजीव प्राजक्त

वाढ़ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,मराठी कविता तुझी सदैव ऋणी राहिल. तुझी कविता एकणे हा एक रोमान्चकारी अनुभव ,कधी तुझे शब्द आनन्दाचे सोनेरी स्वप्न घेउन येतात तर कधि दुक्खचा वैशाख वणावा,कधि इश्काची गुलाबी स्वपने तर कधि विरहाची काळ रात्र .तु शत प्रतिशत कवि आहेस . भाव आणि शब्द तुज़े कायमचे गुलाम पाहिजे तेव्हा पाहिजे त्या रुपात भावात तुझ्या साथीला ते तयार.
मानवी मनातले कुठ्लेहि भाव तुला अनोळाखी नाहीत ,तुज़े भाव विश्व तु निर्मितोस आमच्या हातला धरुन सफरिला नेतोस ,शब्द आणि भाव इतके प्रभावी कि सोडु म्हणता तरी हात सुटत् नहि. .
पुराण कथेताल्या विश्मित्रानी स्वताहाचे एक जग निर्माण केले होते तु हि तसेच जग तुज्या रसिक श्रोत्यां साठी निर्माण करतोस आत जायचा रस्ता कळतो पण बाहेर पडायाचा रस्ता मात्र दिसत नहि,तुझ्या महिअफिलिच्या बाहेर पड तो तो तुज्या शब्दांच्या रमल खुणाची शाल पांघ रुनच..प्रेक्षकाला बंदिस्त करणारी तुझी कविता . एक इष्टपत्तिच बाँधणरि तरिही मुक्त करणारी,,,तरुणाइ शब्दावर डोलते आणि बुजुर्गायत विचार करते,अशि बहुआयामी कविता ,शब्दात बंदिस्त न होणारी.तुझ्या काव्यापुढे हे शब्द केवळ l अपुरेच. शब्द सम्पत्तिच्या ह्या बेताज बादशाहला द्ययाचे तरी काय
शुभेच्छा आणि शुभेछां शिवाय ,.
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२
चिरंजीव प्राजक्त